Friday, October 2, 2009

राष्ट्रपिता महात्मा गांधी

हुशार मुलांची तुलना ते कधीच इतरांबरोबर करत नसत. विद्यार्थ्यांवर ते पूर्ण विश्‍वास टाकत. परिक्षा चालू असताना विद्यार्थ्यांवर ते कोणताही पहारा ठेवत नसत. लहानात लहान मुलालाही आपण कोणीतरीकाशी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात महात्मा गांधी म्हणाले होते, ""शिक्षण फक्त चांगल्या नोकऱ्या मिळण्यासाठी नसते तर माणसाने आयुष्यभर ताठ कण्याने वावरावे, जगताना शूर सैनिक असावे आणि समाजात ताकदीने पूर्ण शक्तीने वावरावे यासाठी असते. शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुलांनी अभ्यास करावा. त्यांचे जगणे कसे सुधारेल हे पहावे. लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेचे प्रबोधन करण्याची गरज आहे.''ही गोष्ट आहे गांधीजी शाळेत असतानाची. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे शाळेत शिकत असतानाच त्यांचे लग्न झालेले होते. त्यांना शाळेत एक मित्र मिळाला होता. खरे तर तो त्यांच्या मोठ्या भावाचा मित्र होता. ते दोघे वर्गमित्र होते. हा मित्र गांधीजींना अतिशय विश्‍वासू वाटत होता. खरे तर त्याच्या काही सवयी आणि वागणे कानावर आल्यामुळे आई, मोठा भाऊ एवढेच नव्हे तर गांधीजींच्या पत्नीनेही त्यांना सावध केले होते. त्या मित्राची संगत चांगली नसल्याचे सांगितले होते. त्यावर गांधीजींना आईला आणि भावाला सांगितले, ""मला माहीत आहे की तुम्ही सांगितलेले काही दुर्गुण त्याच्यात आहेत. पण त्याच वेळी त्याच्यातील चांगल्या गुणांची तुम्हांला कल्पना नाही. त्याला सुधारण्यासाठीच मी त्याच्याशी मैत्री केलेली आहे आणि तो सुधारला तर त्याच्याइतका चांगला माणूस भेटणार नाही, असा मला विश्‍वास आहे. तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका.'' परंतु त्याच वेळी गांधीजींच्या मनाच्या एका कोपऱ्यात आपले चुकत असल्याची भावना होती. ज्याच्यात सुधारणा घडवून आणायची आहे, त्याच्याशी अत्यंतिक जवळून ठेऊन ते काम होत नाही, याची त्यांना कल्पना होती. एके दिवशी त्यांच्या या मित्राने गांधीजींना सांगितले, की त्यांचे अनेक शिक्षक लपूनछपून मांसाहार करतात आणि दारूही पितात. शाळेतील काही मुलेही त्यांच्यात सहभागी असल्याचे त्याने सांगितले. त्यावर निरागस मनाच्या मोहनदासला आश्‍यर्च वाटले आणि दुःखही झाले. त्यांनी मित्राला याबाबत विचारलेही. त्यावर मित्राने हुशारीने सांगितले, ""आपण दुर्बल आहोत कारण आपण मांस खात नाही. ब्रिटिश लोक मांस खातात म्हणून आपल्यावर राज्य करतात. मी एवढा काटक आणि वेगाने का पळू शकतो माहीत आहे का, कारण मी मांसाहार करतो. मांसाहार करणारी व्यक्ती पडली तरी तिला फारसे लागत नाही. लागले आणि जखम झालीच तर ती लवकर बरी होते. आपले शिक्षक आणि इतर प्रतिष्ठित व्यक्ती मांसाहार करतात ते काही मूर्ख नाहीत. तू पण एकदा मांसाहार करून बघ. एकदा खाऊन बघायला काय हरकत आहे? तुझ्या लक्षात येईल की त्यामुळे काय शक्ती मिळते.''अर्थात त्याने एकदा सांगितले आणि गांधीजी मांसाहार करायला लागले असे घडले नाही. प्रत्येक वेळेला तो मित्र वेगवेगळी उदाहणे देऊन गांधीजींनी प्रभावित करण्याच प्रयत्न करत असे. तो मित्र वेगाने खूप अंतर पळू शकतो. लांब उडी, उंच उडी मारू शकतो. पुन्हा शिक्षकांनी त्याला कितीही कडक शिक्षा केली, मारले तरी तो हूं की चूं करत नाही हे ते पाहत होते. त्याच वेळी ते स्वतःच्या शरीराकडे ते पाहत. तुलनेत त्यांची शरीरयष्टी अगदीच शिडशिडीत होती. त्यांच्या मनात येत असे, आपल्याला नेहमीच चोरांची, भुताची, अंधाराची भीती वाटते. अंधारात आपण एकटे जाऊ शकत नाही, रात्री अंधाऱ्या खोलीत एकटे झोपू शकत नाही. सापांची आणि अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांची आपल्याला भीती वाटते, असे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू होते. त्यामुळे धष्टपुष्ट आणि धीट होण्यासाठी त्यांनी मांसाहार करून पाहण्याचे ठरवले. गांधी घराणे वैष्णव. त्यांच्या घराण्यात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. त्यामुळे घरात ही गोष्ट कळली तर आईवडिलांना सहन करता येणार नाही एवढा धक्का बसेल, ही वस्तुस्थिती गांधीजींना माहिती होती. तरीदेखील ताकदवान आणि धाडसी होण्याच्या कल्पनेने त्यांना पछाडले असल्यामुळे त्यांना आईवडिलांची भीती वाटत नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर मांसाहार केला पाहिजे हे त्यांच्या मनावर ठसले होते. मग एके दिवशी त्यांच्या मित्राने नदीच्या किनारी मांसाहारी जेवणाची सगळी व्यवस्था केली. त्या वेळी ते मांस अतिशय कडक लागल्यामुळे गांधींना ते आवडले नाही आणि ते न खाताच परतले. तेवढ्या घटनेने रात्री त्यांना झोप आली नाही. हे प्रकरण एवढ्यावर थांबायला हवे होते. पण तो मित्र फारच चिकाटीचा होता. पुढच्या वेळेला त्यांना शासकीय विश्रामगृहात जेवणाची तयारी केली. सर्व पदार्थांची चांगली मांडामांड केली, सजावट केली- जेणेकरून पाहणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटावे. मग असे जेवण करून आल्यावर गांधीजी घरी काहीतरी थाप मारून जेवणार नसल्याचे सांगत. वर्षभरात अशी पाच-सहा जेवणे झाली. कारण त्या मित्राकडे नेहमी असे जेवण करण्यासाठी तेवढे पैसे नव्हते. आपण मांसाहार करतो ही गोष्ट आईवडिलांना समजली तर त्यांना मोठा धक्का बसेल, याची गांधीजींना कल्पना होती. त्याचे गांभीर्य समजल्यावर त्यांनी मांसाहार वर्ज्य करण्याचे ठरवले आणि तसे मित्रांना सांगितले. नंतर आयुष्यात पुन्हा कधीही त्यांनी मांसाहार केला नाही.त्याच वेळी त्यांना सिगारेट ओढण्यात शौर्य वाटू लागले होते. सिगारेट ओढण्यातून काही आनंद मिळतो म्हणून नव्हे तर तोंडातून धूर सोडण्यातील गमतीसाठी ते आणि त्यांचा एक नातेवाईक मिळून सिगारेट ओढत असत. त्यांचे काका सिगारेट ओढत असत आणि त्यांना पाहून त्यांची नक्कल ही दोन मुले करत असत. अर्थात सिगारेट विकत आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे काकांनी फेकून दिलेली थोटके गोळा करून ते ती ओढत असत. परंतु त्यातून फारसा धूर निघत नसे. मग सिगारेट खरेदी करण्यासाठी ते घरातून पैसे चोरू लागले. परंतु लवकरच त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात आला आणि हे सगळे बंद केले. हे सगळे ते तेरा-चौदा वर्षांचे असताना घडले. त्यांच्याबरोबर त्यांचा एक भाऊदेखील मांसाहार करू लागला होता. नंतर त्याने या सवयीमुळे उधारी करून ठेवली. ती त्या काळात पंचवीस रुपये एवढी होती. गांधीजींनी या भावाचे सोन्याचे कडे चोरून त्याची उधारी भागवली. परंतु या घटनेने त्यांचे मन त्यांना खाऊ लागले. त्याचबरोबर आपण आईवडिलांच्या नकळत मांसाहार करत होतो, सिगारेट ओढत होत यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. या सगळ्याचे प्रायश्‍चित्त घेण्याचे त्यांनी ठरवले. हे सगळे वडिलांना सांगून मोकळे व्हावे असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी मोठे धाडस करून त्यांनी आपल्या सर्व चुकीच्या कृत्यांची माहिती एका कागदावर लिहिली आणि थरथरत्या हाताने वडिलांना तो कागद दिला. त्यांनी ती वाचली आणि त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांच्या मनाला तीव्र वेदना होत होत्या आणि त्या त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आता ते कडक शिक्षा करतील, असे गांधींजींना वाटले होते. वडिलांनी तो कागद फाडून टाकला. ते गांधीजींना म्हणाले, तुला तुझी चूक कळली हेच तुझे प्रायश्‍चित्त. गांधींच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले. या घटनेने माझे डोळे उघडले, असे ते म्हणाले. मी जर चित्रकार असतो तर त्या घटनेचे चित्र काढून दाखवले असते, असे ते म्हणाले. गांधीजी आयुष्यात नंतर महान कार्य करू शकले, सत्याग्रह आणि अहिंसेच्या जोरावर ब्रिटिश सत्तेला वाकवू शकले त्याचे मूळ या घटनेत आहे.शिक्षण आणि गांधीजीगांधीजी शारीरिक शिक्षेच्या विरुद्ध होते. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी फक्त एकदा एका मुलाला छडीने मारले होते. त्या वेळी लगचेच त्यांचा अंतर्बाह्य थरकाप झाला होता. ते अस्वस्थ झाले होते ते स्वतःवरचा ताबा गेल्यामुळे. त्या मुलाने गांधीजींकडे पुन्हा पुन्हा क्षमा मागितली, ती माराच्या दुःखामुळे नव्हे तर आपण गांधीजींच्या मानसिक शांतीला धक्का लावला याचा त्याच्या मनाला घोर लागल्यामुळे. विद्यार्थ्यांनी खेळात भरपूर चढाओढ करावी, स्पर्धा करावी असे ते म्हणत. शिक्षणातील स्पर्धा मात्र त्यांना मान्य नव्हती. आश्रमातील आहोत असे वाटले पाहिजे, असे ते म्हणत. शिक्षण घेऊन जर मुले स्वतःच्या हाताचा वापर करणे विसरत असतील किंवा शारिरीक श्रमाचे काम करण्याची त्यांना लाज वाटत असेल तर निरक्षर राहून त्यांनी दगड फोडण्याचे काम केले तरी चालेल, असे त्यांचे मत होते. त्यांनी त्यांच्या नातवाला कापूस कसा तयार होतो, सुतापासून कापड कसे विणले जाते, धागे कसे मोजतात, हे सगळे समजावून सांगितले होते. उत्तम हस्ताक्षर हा शिक्षणाचा एक भाग आहे, असे ते मानत. त्यांना स्वतःच्या वाईट हस्ताक्षराची लाज वाटत असे. ते शिक्षकांना सांगत, ""मुलांना आधी रेघा, कंस, त्रिकोण, पक्षी, फुले, पाने यांची चित्रे काढायला सांगा म्हणजे मग ती चांगल्या अक्षरात लिहू शकतील.''-

No comments:

Post a Comment